शेतकऱ्याला मोठा धक्का बसणार हे काम केले नाही तर पी एम किसानचा 20 वा हप्ता थांबणार
PM Kisan Yojana :
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM Kisan Yojana ही भारत सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या शेतीसाठी काही प्रमाणात सहाय्यक ठरते.
हे सुद्धा वाचा
बियाणं उगवणार की नाही? हे 3 घरगुती उपाय करून लगेच तपासा !
सध्या एप्रिल ते जून २०२५ या कालावधीसाठीचा 20 हप्ता देण्यात येणार असून, तो येत्या जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु, जर एखाद्या शेतकऱ्याने आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नसेल, जसे की ई-केवायसी, आधार सिडिंग, बँक खाते जोडणी, नवीन नोंदणी इत्यादी, तर त्याला हा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे कृषी विभागाकडून सर्व शेतकऱ्यांना वेळेत सर्व औपचारिकता पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ई-केवायसी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक ‘नो युवर कस्टमर’ ही प्रक्रिया आता या योजनेसाठी बंधनकारक झाली आहे. शेतकऱ्यांनी मोबाईलद्वारे चेहरा किंवा अंगठा स्कॅन करून ही प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच, जे शेतकरी स्मार्टफोन वापरणार नाहीत, त्यांनी महा ई-सेवा केंद्रांमध्ये जाऊन किंवा कृषी सहाय्यकाच्या मदतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा
दुसरी महत्त्वाची अट म्हणजे बँक खाते आणि आधार यांची सिडिंग म्हणजेच दोघांमध्ये जोडणी. जर शेतकऱ्याचे बँक खाते आधारशी लिंक नसेल, तर सरकारकडून दिली जाणारी आर्थिक मदत त्याच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे ही जोडणी वेळेत करून घेणे खूप गरजेचे आहे.
2 thoughts on “शेतकऱ्याला मोठा धक्का बसणार हे काम केले नाही तर पी एम किसानचा 20 वा हप्ता थांबणार”