नागपूर : मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी ‘जीवंत सातबारा’ मोमोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामध्ये मृत खातेदारांची नावे कमी करून त्यांच्या वारसांची नावे सातबारावर नोंद करण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Satbara Durusti : सातबाऱ्यात चूक असेल तर दुरुस्त कशी करायची?

जिवंत सातबारा मोहिमेबाबत बावनकुळे म्हणाले, वारस नोंदणी प्रक्रियेमध्ये अनेक वर्षे दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वेळा मयत खातेदारांच्या नावावरच जमिनी राहतात, त्यामुळे त्यांच्या वारसांना मालकी हक्क मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने शेतकरी त्रस्त होतात. satbara